शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारकडून 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी  !  शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारकडून 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर

 

famer-loan-waiver

 शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 


पहा काय म्हणाले मुख्यमंत्री


 नियमित कर्ज परतफेड Loan Waiver   करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. 

 Agriculture News. तसेच 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली आहे, अश्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. याशिवाय या योजनेमध्ये 2017-18, 2018-19 व 2019-20 या कालावधीमध्ये मान्य बँक किंवा संस्थां त्यांच्याकडून घेतलेले शेतकऱ्यांचे कर्ज पात्र आहे.


 जर यामध्ये एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या वारसांनी त्याच्या पीक कर्ज परतफेड केली असेल तर त्या वारसाला सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळेल, अशी माहिती हि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.niyamit karj mafi anudan

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad