शेतकऱ्यांकरीता खुशखबर..! वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज सुरू झालेत, ‘या’ संकेतस्थळावर सादर करता येणारा अर्ज

Maharashtra Farmer Scheme


Maharashtra Farmer Scheme { news } : शेती या व्यवसायात पाणी हा एक महत्त्वाचा घटक मनाला जातो. पाण्याविना शेती करणे शक्य नाहीच. जर शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता नसेल तर अश्या शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळवता येत नाही च. जर पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला नाही तर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी हे उपलब्ध नसते.

आणि अशा या परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी शेततळे बनवले तर शेततळ्यामध्ये पाणी हे  साठवून ठेवून या पाण्याचा वापर हा रब्बी आणि व उन्हाळी या हंगामासाठी केला जाऊ शकतो. शेत-तळ्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातीमधील पिकांना योग्य पाणी उपलब्ध राहते . आणि तसेच शाश्वत हि पाण्याची भाजीपाला व फळबाग पिकांसाठी देखील  सोय होते.


शेतकऱ्यांना शेतीतुन  शाश्वत उत्पन्न हे मिळवता येते, अर्थातच शेततळे असले तरच . परंतु  असे असले तरी शेतात शेततळे तयार करण्याकरिता जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना खर्च हा करावा लागतो. तो खर्च प्रत्येकच शेतकऱ्याला झेपेल जातो असे नाही. यामुळेच पैसे अभावी अश्या बलिराज्यांना शाश्वत पाण्यासाठी शेततळ्याची व्यवस्था हि करता येत नाही.

बळीराज्याची अशी ही अडचण ओळखून राज्य सरकारच्या अंतर्गत शेततळे बनवण्यासाठी अनुदान हे पुरवले जात आहे. मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन या योजनेअंतर्गत  75 हजार रुपयांपर्यंतचे शेतकऱ्याला वैयक्तिक शेततळ्यासाठी  अनुदान हे दिले जात आहे. या दरम्यान एक महत्त्वाची माहिती आता या योजनेबाबत हाती आली आहे.अश्या मिळालेल्या माहितीनुसार वैयक्तिक शेततळ्याला अनुदान मिळवण्यासाठी अर्ज हे सुरू झाले आहेत.


वैयक्तिक शेततळ्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज हे मागविले आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बलिराज्यांना अर्ज हे सादर करता येणार आहे.शेतकऱ्यांना अधिका-अधिक अर्ज हे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या अंतर्गत देखील करण्यात आले आहे. यासाठी या योजनेसाठी अर्ज कुठे करता येणार आहे या बाबद थोडक्यात जाणून घेणार आहोत.


राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार

शासनाकडून वैयक्तिक शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाते. आधी शेततळ्याकरीता 50,000 पर्यंतचे अनुदान मिळत होते परंतु आता यामध्ये 25 हजाराची वाढ हि झाली असून सध्या शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान हे दिले जाते. आकारमानानुसार शासनाकडून या  योजनेच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांना 28 हजार रुपयांपासून - ते 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान हे  मिळत आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता

या योजनेचा लाभ हा  महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना दिला जात आहे. याचा लाभ फक्त  शेतकऱ्यांनाच मिळतो. तसेच शेतकऱ्याकडे या योजनेच्या लाभासाठी  किमान 0.60 हेक्टर जमीन हि असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याकडे शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी जमीन असणे गरजेचे आहे. वशेतकऱ्यांनी कोणत्याच शेततळे  योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही महत्वाची अट आहे.


शेत तळे योजनेचा अर्ज कुठे करावा लागणार

लाभासाठी शेतकऱ्यांना  महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शेततळ्याच्या योग्य  अर्ज हा सादर करावा लागतो. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड हि शेततळ्यासाठी सर्व शेतकऱ्यांमधुन आतापर्यंत  लॉटरी या पद्धतीने होत असे. पण आता लॉटरी पद्धत हि बंद झाली असून ज्या शेतकऱ्यांना शेततळ्याची गरज आहे अश्या सर्वांनाच टप्प्याटप्प्याने  या योजनेतून अनुदान पुरवले जाणार आहे. आता शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून अर्ज हे मागवले जात असून यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात-लवकर अर्ज करावा असे आवाहन देखील केले जात आहे.

शेततळे योजनेसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार

या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अर्जदार शेतकऱ्यांना जमीनीचा सात-बारा (७ / १२ ) आणि 8-अ उतारा,अर्जदाराच्या आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र व जातीचा दाखला ( मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना जातीचा दाखला  सादर करावा लागतो) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad